लातूर- औसा तालुक्यातील माळकोंडजी येथील शेतकरी भागवत किसन जगताप (वय ३५) या शेतकऱ्याने मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या शेतकऱ्यावर खासगी व्यक्तीचे कर्ज होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. याच कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, अशी शंकाही नातेवाइकांनी व्यक्त केली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.