आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना अटक करा, नाहीतर मुंबईत मोर्चा काढू, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. यासाठी आंबेडकरांनी सरकारला 26 मार्चपर्यंतची मुदतही दिली आहे.
"कोरेगाव-भीमा हिंसाचार भडकावण्याच्या कटात मिलिंद एकबोटे यांच्यासह संभाजी भिडेही यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे मिलिंद एकबोटेंना अटक केल्यानंतर आता संभाजी भिडेंनाही 26 तारखेपर्यंत अटक करा, अन्यथा कोरेगाव-भीमा शौर्य दिन प्रेरणा अभियान आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे मुंबईत मोर्चा काढू," असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.