आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकांना उल्लू बनवतात.’ अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केली आहे. रत्नागिरीध्ये रिफायनरी विरोधी सभेत त्याने शिवसेनेवर निशाणा साधला.
शिवसेनेची नीती
‘रत्नागिरीत प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगायचे आणि तिकडे आतून जमिनींचे व्यवहार करायचे ही शिवसेनेची नीती आहे. हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी कोकणातील प्रकल्प रद्द करुन दाखवावे.’ असे आव्हानही राणेंनी दिले आहे.
लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट
‘मी या सगळ्याकडे राजकारणापलीकडे जाऊन पाहत आहे. येथील जमिनींवर आलेले हे संकट घालवण्यासाठी सगळ्यांनी मिळून संघर्ष करणे गरजेचे आहे. या संदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ.’ असेही राणे यावेळी म्हणाले. ‘कोणाच्या दबावाखाली पोलिस अधिकारी आणि महसूल अधिकारी सर्वसामान्य लोकांना त्रास देत असतील तर सहन करुन घेतले जाणार नाही. असेही राणे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नारायण राणे यांच्यासह माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे या दोघांनीही आपल्या भाषणात शिवसेनेवर टीका केली.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.