आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनातन संस्थेचे जयंत आठवले यांना अटक करा.. 500 तरुणांना शस्त्र प्रशिक्षण- विखे पाटील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र आणि कर्नाटकामधील चारही विचारवंतांच्या हत्येचा मूळ सूत्रधार शोधायचा असेल तर पोलिसांनी सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना अटक करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली. ते म्हणाले, डॉ. दाभोलकरांसारख्या विचारवंतांची हत्या करणारे सचिन अणदुरे आणि शरद कळसकर पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण मागील काही महिन्यांमध्ये अशा सुमारे ५०० तरुणांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात आले असून ते अजूनही मोकाट आहेत. त्यांना शोधून काढायचे असेल तर पोलिसांनी जयंत आठवले यांना ताब्यात घेण्याची गरज अाहे. 


कट्टरवादी संघटनांना वेसण घालण्यासंदर्भात सरकारची भूमिका प्रामाणिक असेल तर अटकेची ही कारवाई तातडीने केली जाईल. एटीएसने मागील दोन आठवड्यांमध्ये केलेल्या कारवाईचे खरे श्रेय कर्नाटक एटीएसला आहे. गौरी लंकेश हत्याकांडाचा तपास करताना त्यांनी अनेक गोष्टींचा छडा लावला आणि त्यातूनच महाराष्ट्रातील हे कट्टरवादी 'नेटवर्क' समोर आले. अन्यथा वैभव राऊतचे बॉम्ब फुटेपर्यंत राज्य सरकारला महाराष्ट्रात काय सुरू आहे याचा पत्ता लागला नसता, अशी टीकाही त्यांनी केली. 

 

बातम्या आणखी आहेत...