आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटलजी अमर आहेत..हृदयात आहेत..सदैव राहतील..; उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या भावना!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'अटलजी आपल्यात नाहीत, यावर विश्वास ठेवायला मन तयार नाही. अटलजी आमच्या हृदयात आहेत. सदैव राहतील', या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

'अहंकार, गर्व, सत्तेतून निर्माण होणारा ताठरपणा त्यांच्यापासून मैलोन् मैल दूर होता. ते सरळ स्वभावाचे, निष्‍कपट राजकारणी होते.

 

तीन वेळा देशाचे पंतप्रधान होत. पण राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व लहान-मोठ्या घटक दलांच्या हातात हात घालून त्यांनी सरकार पुढे नेले. त्यांना भेटण्याचा योग अनेकदा आला. एका वडीलधार्‍याच्या मायेने त्यांनी प्रेम केले. सदैव आशीर्वाद दिले. त्यांचे निर्मळ मन व सदैव हसतमुख चेहरा म्हणजे भारतीय राजकारणाची प्रेरणा होती.

 

तीन वेळा देशाचे पंतप्रधान होत. पण राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व लहान-मोठ्या घटक दलांच्या हातात हात घालून त्यांनी सरकार पुढे नेले. त्यांना भेटण्याचा योग अनेकदा आला. एका वडीलधार्‍याच्या मायेने त्यांनी प्रेम केले. सदैव आशीर्वाद दिले. त्यांचे निर्मळ मन व सदैव हसतमुख चेहरा म्हणजे भारतीय राजकारणाची प्रेरणा होती.

 

शिवसेनाप्रमुखांनंतर आम्ही एक भीष्‍म पितामह गमावला..
शिवसेनाप्रमुखांशी असलेला त्यांचा स्नेह जगजाहीर होता. अनेक विषयांवर त्यांच्या चर्चा होत असत. अटलजींच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे एनडीए मजबूत राहिली. अटलजींच्या जाण्याने संसदीय लोकशाहीची, देशाची प्रचंड हानी झाली. शिवसेनाप्रमुखांनंतर आम्ही एक भीष्‍म पितामह गमावला. त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वास साष्टांग दंडवत घालून आम्ही विनम्र आदरांजली वाहत आहोत. शिवसेना परिवार त्यांना मानवंदना देत आहे. अटलजी तुमच्यासारखे तुम्हीच. तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही,' असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

 

शिवसेनाप्रमुखांशी असलेला त्यांचा स्नेह जगजाहीर होता. अनेक विषयांवर त्यांच्या चर्चा होत असत. अटलजींच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे एनडीए मजबूत राहिली. अटलजींच्या जाण्याने संसदीय लोकशाहीची, देशाची प्रचंड हानी झाली. शिवसेनाप्रमुखांनंतर आम्ही एक भीष्‍म पितामह गमावला. त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वास साष्टांग दंडवत घालून आम्ही विनम्र आदरांजली वाहत आहोत. शिवसेना परिवार त्यांना मानवंदना देत आहे. अटलजी तुमच्यासारखे तुम्हीच. तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही,' असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

 

अटजींबाबत  यांनी व्यक्त केल्या भावना...

 

अटलजी यांच्या निधनाने सर्वाधिक लाडके नेते गमावले..विद्यासागर राव

'भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आपले सर्व कार्यक्रम रद्द करून राज्यपाल दिल्लीला रवाना होत आहेत. 

 

"स्वतंत्र्योत्तर भारताच्या राजकीय जीवनात तसेच लोकमानसावर अनेक दशके अधिराज्य गाजविणारे अटल बिहारी वाजपेयी हे देशातील उत्तुंग प्रतिभा लाभलेले शालीन व्यक्तिमत्व होते.

ते एक परिपूर्ण संसदपटू, द्रष्टे मुत्सद्दी, अमोघ वक्ते तसेच सुहृद व्यक्ती होते.

 

वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारताने एक महासत्ता म्हणून आपला न्याय्य हक्क जगापुढे जोरकसपणे मांडला", असे अटल बिहारी यांच्या मंत्रिमंडळात गृह, उद्योग व वाणिज्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम केले असलेल्या विदयासागर राव यांनी आपल्या शोकसंदेशमध्ये म्हटले आहे.  

 

“श्री वाजपेयी माझे राजकीय जीवनातील प्रेरणास्थान होते. सन १९७५ साली मी करीमनगर (तेलंगणा) जिल्हा जनसंघाचा अध्यक्ष असताना श्री वाजपेयी यांनी करीमनगर येथे एका महासभेला संबोधित केले होते. त्यानंतर काही महिन्यांनी आणिबाणी लागली व आम्हाला तुरुंगवास भोगावा लागला. या घटनेनंतर २३ वर्षांनी मला वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात गृह, उद्योग व वाणिज्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या निधनाने देशाने एक अभूतपूर्व आदर व लोकप्रियता लाभलेले राजकारणातील ‘भीष्म पितामह’ गमावले आहे; तर मी माझे लाडके नेते गमावले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने तसेच माझ्या स्वतःच्या वतीने मी वाजपेयी यांच्या स्मृतींना आपली आदरांजली वाहतो.'
- विद्यासागर राव, राज्यपाल


अटलबिहारी वाजपेयी यांच्यानिधनाने राष्ट्रसुर्याचा अस्त
'माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने राष्ट्रसुर्याचा अस्त झाला आहे. उच्च नैतिकमूल्य व वैचारीक अधिष्ठान असलेले राष्ट्रीय नेतृत्व आपण गमावलं आहे अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

 

आपल्या शोकभावना व्यक्त करताना अजित पवार म्हणाले की, स्वपक्षासह विरोधकांचा विश्वास संपादन केलेले ते एकमेव नेते होते. प्रखर देशभक्त, संसदीय लोकशाहीवर प्रगाढ श्रध्दा, महान साहित्यिक, कवी मनाचं संवेदनशील व्यक्तीमत्व ही त्यांची ओळख होती. त्यांचं वक्तृत्व अद्वितीय होतं. त्यांच्यासारखा वक्ता, त्यांच्यासारखा नेता, त्यांच्यासारखा माणूस पुन्हा होणे नाही. सत्तारुढ आणि विरोधकांनी मिळून देशाला, लोकशाहीला पुढे घेवून जाण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला होता. त्यांच्या निधनानं देशाची, आंतरराष्ट्रीय राजकारणाची, लोकशाही परंपरेची मोठी हानी झाली आहे. अशा शब्दात त्यांच्या कार्याला, स्मृतींना, विचारांना भावपूर्ण श्रध्दांजली...'
- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री


देशव्यापी आणि देशभक्त नेतृत्वाची उणीव नक्कीच भासेल...
'स्वातंत्र्यपूर्व असो वा स्वातंत्र्योत्तर भारत ते नवीन सहस्रकातील भारत अशा दीर्घ पटलावर, अर्धशतकाहून अधिक कालावधीची, अटलजींची राजकीय कारकीर्द होती.

 

पण एवढ्या दीर्घ कालावधीत अटलजी कधीच संदर्भहीन झाले नाहीत उलट, प्रत्येक सरत्या दशकात आणि बदलत्या पिढीत त्यांची गरज जास्तच भासू लागली. आणि म्हणूनच नव्या सहस्रकात प्रवेश करताना देशाचं नेतृत्व अटलजींच्या हाती आलं ह्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.

 

काँग्रेस पक्ष जवळपास अजिंक्य वाटत असताना, आणि राजकीय कारकिर्दीचा दीर्घ कालावधी विरोधी पक्षात बसून राजकारण करावं लागत असलं तरी कटुता, हेवेदावे, त्यांच्या व्यक्तिमत्वात आली नाही आणि दीर्घ कालावधीनंतर सत्तेत आल्यावर देखील त्यांच्या व्यक्तिमत्वातील शालीनता टिकून राहिली.

 

साहित्य, संस्कृती, प्राचीन इतिहास अशा विविध विषयांच्या वाचनाने स्फुरलेली अटलजींची वाणी ही माझ्या पिढीने ऐकली, अनुभवली, त्यांचं सुसंस्कृत राजकरण हे जवळून बघता आलं ह्याचा मला खरंच आनंद आहे. भारतीय स्वातंत्र्य पंचाहत्तरीकडे वाटचाल करत असताना खऱ्या अर्थाने शेवटच्या देशव्यापी आणि देशभक्त नेतृत्वाची उणीव नक्कीच भासेल. अटलजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन.'
- राज ठाकरे

 

भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले!
'माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले असून, त्यांच्या रूपात एक समर्पित, संवेदनशील आणि खंबीर नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

वाजपेयी यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, कवि मनाचे वाजपेयी संवेदनशील तर होतेच. पण ते तेवढेच कणखरही होते. देशहित हेच त्यांचे पहिले प्राधान्य होते. पंतप्रधान म्हणून त्यांनी देशासाठी भरीव योगदान दिले. 1991 मध्ये भारताने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि वाजपेयींच्या काळात त्याला गती देण्यात आली. पंतप्रधान म्हणून त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. त्या काळात आमचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांनी संत तुकाराम महाराजांची प्रतीमा असलेले नाणे काढण्याची मागणी केली होती आणि त्या मागणीला अटलबिहारी वाजपेयी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसा निर्णय घेऊन त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्यात आली व नवी दिल्लीतील एका सोहळ्यात थाटामाटात संत तुकाराम महाराजांची प्रतीमा असलेल्या नाण्याचे अनावरण झाले, अशी आठवणही विखे पाटील यांनी विषद केली.

 

एक उत्तम वक्ते म्हणून देखील अटलबिहारी वाजपेयींचे नेहमीच स्मरण केले जाईल. त्यांचे अनेक भाषण, कविता आपण ऐकल्या आहेत. अतिशय परखड आणि नेमक्या शब्दांत व्यक्त होण्याची विलक्षण शैली त्यांच्याकडे होती. त्यांच्या देहबोलीतून आणि शब्दांतून त्यांचा बाणेदारपणा प्रकट होत असे. त्यांच्या निधनामुळे भारताची मोठी हानी झाली असून, भारताच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर राहिल, या शब्दांत राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली.'
-विखे पाटील

 

बातम्या आणखी आहेत...