- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर शहा म्हणाले, आम्ही आमच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा उल्लेख केला होता. यात कुठल्याही प्रकारचा फायदा मिळवण्याचा हेतू नाही. सरकार चर्चा करणार आणि त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.
- महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. अशा प्रकारच्या घोषणा करणाऱ्या राज्य सरकारांनीच कर्जमाफीची तरतूद करावी असे शहा यांनी सांगितले. विशेष म्हणजे, यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही कर्जमाफीवर राज्यांना केंद्र सरकार काहीच मदत करणार नाही असे स्पष्ट केले आहे.
- यासोबतच राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारावर सध्या चर्चा सुरू आहे. या चर्चेनंतरच उमेदवाराच्या नावाचा निष्कर्श काढला जाणार आहे असे शहा यांनी म्हटले आहे.