मुंबई - मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची रिद्धी कंपनी काहीही व्यवसाय न करता इतका पैसा कसा कमावते, असा प्रश्न करत शेलारांनी ४५ घोटाळे केल्याचा आरोप आपच्या प्रीती शर्मा-मेनन यांनी केला. मात्र, शेलार यांनी हे आरोप फेटाळले.
तूर डाळीपासून बचत गट असे एकंदर ४५ घोटाळे शेलार यांनी केले असून या घोटाळ्यांची गंभीर दखल घेत त्यांच्यावर कारवाई करावी. सत्ताधारी पक्ष स्वपक्षीय नेत्याला वाचवत आहे का, असा सवालही शर्मा यांनी केला.