मुंबई- राज्यातील दुष्काळामुळे देशभरात भाज्यांचे दर वाढले आहेत. हॉटेल व्यावसायिकांनाही या दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहेत. देशातील विविध शहरांमध्ये महाराष्ट्रातून पालेभाज्यांचा पुरवठा केला जातो. मात्र, यंदा राज्यात दुष्काळ असल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. पर्यायाने भाज्यांमध्ये दरवाढ झाली आहे.
- गुजरातच्या राजकोटमध्ये टमाटरचे भाव 100 रुपये प्रतिकीलो आहेत.
- भोपाळमध्ये 80 रुपये तर, मुंबईत 58 रुपये किलोने टमाटर विकले जात आहेत.
- इतर भाज्यांमध्येही कमालीची दरवाढ झालेली दिसते.
- देशातील मोठ्या शहरांमध्ये हिरव्या भाज्याही सरासरी 50 रुपये प्रतिकीलो दराने विकल्या जात आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, 14 जून रोजी असे होते भाज्यांचे भाव..