मुंबई - शेतकरी कर्जमाफीनंतर 7 वा वेतन आयोग लांबण्याची चर्चा सुरू असतानाच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात तीव्र असंतोष पसरला आहे. याचे पडसाद गुरुवारी सकाळी मंत्रालयासमोर दिसून आले. मंत्रालयाच्या आरसा गेटसमोर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. तसेच घोषणाबाजी करताना 7 वा वेतन आयोग तत्काळ लागू करण्याची मागणी केली. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वीच राज्यातील विविध कर्मचारी संघटनांनी वेतन आयोग तत्काळ लागू करण्याच्या मागणीवरून राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे.