एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी, जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तोपर्यंत कर्मचारी आणि कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी, या तीन प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
संपाच्या बाजूने 90 टक्के कर्मचारी
सर्व संघटना समावेशक असलेल्या या संपामुळे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका संपात सहभागी संघटनांनी घेतली आहे. 26 मे 2017 रोजी राज्यातील प्रत्येक एसटी आगारात संपाच्या संदर्भात मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यावेळी संपाच्या बाजूने 90 टक्के कर्मचाऱ्यांनी कौल दिला होता.