मुंबई- मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ब्राझील टीमसोबत मेजवानी झालीच नाही तर फक्त भेट झाल्याचे सांगितले आहे. एलफिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला. मात्र महापौर त्याच दिवशी मेजवाणी होते असा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेऊन महाडेश्वर यांनी माहिती दिली.
पाहुण्यासोबत फक्त स्नॅक्स आणि चहा
पाहुणा आल्यावर घरी आल्यावर आपण त्याचे स्वागत करतो. मुंबईचा महापौर म्हणून त्यांचे स्वागत केले. तिथे कोणत्याही प्रकारची मेजवानी किंवा पार्टी नव्हती. रोषणाई नव्हती, बडेजाव नव्हता. कोणतेही नृत्य नव्हते, काहीही नव्हते. इथे आम्ही त्यांना फक्त स्नॅक्स आणि चहा दिला. त्यांच्याशी हस्तांदोलन केले. ते निघत असताना, युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे इथे आले आणि त्यांना भेटले, असे महापौरांनी सांगितले.
शेलारांवर जोरदार टीका
भाजप नेते आशिष शेलार यांनी जाणीवपूर्व आरोप केले, कारण त्यांच्या पक्षाचे किरीट सोमय्या दुर्घटनेच्या संध्याकाळी दांडिया रासमध्ये थिरकत होते, असा पलटवारही त्यांनी केला. त्यांच्या पक्षाप्रमाणेच इतर पक्षातही असंवेदनशील नेते आहेत, असे कदाचित आशिष शेलार यांना वाटत असेल असा चिमटाही त्यांनी काढला.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती