14 जानेवारी 1761 रोजी तिसऱ्या पानिपत युद्धात मुघलांकडून लढणाऱ्या मराठ्यांचा दारुण पराभव झाला. त्याला 255 वर्षे झालीत. अटकेपार झेंडे रोवणाऱ्या मराठ्यांना एवढा मोठा पराभव का स्वीकारावा लागला, या युद्धाचा नंतरच्या भारतीय राजकारणावर काय परिणाम झाला, याचा divyamarathi.com घेतलेला हा धांडोळा...
पानिपतमध्ये झाली तीन युद्धे
पानिपत. भारताच्या इतिहासाशी घट्ट नाते असलेले शहर. या शहराच्या आसपास इतिहासातील तीन युद्धे झाली. पहिले युद्ध 1526 मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि बाबर, दुसरे 1556 मध्ये हेमू आणि मुघल आणि तिसरे 1761 मध्ये अब्दाली आणि मराठे यांच्यात. तिसऱ्या युद्धात अब्दाली हा मुघलांवर चाल करून आला होता. मुघलांच्या संरक्षण करारामुळे मराठ्यांना लढावे लागले. यात मराठ्यांचा, मुघलांचा दारुण पराभव झाला.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, या पराभवाची कारणे...