आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण, राज यांची मात्र मौनाचीच भाषा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी माणसाच्या हितासाठी राज ठाकरे यांच्या पक्षाशी युतीच्या प्रस्तावाचे स्वागतच करू, असे स्पष्ट करतानाच टाळी एका हाताने वाजत नाही. हा निर्णय दोन्ही बाजूंनी व्हावा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी बुधवारी एकत्र येण्यावर भाष्य केले. यावरून राजकीय वर्तूळात चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे यांनी मात्र याबाबत सध्याच काहीही बोलणार नसल्याचे बुधवारी सभेत स्पष्ट केले.

उद्धव यांनी बुधवारी दिलेल्या मुलाखतीत वरील संकेत दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर दोघे भाऊ एकत्र येतील, अशी चर्चा सुरू आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका नाही

दोन्ही कुटुंबे एकत्र आल्यास आनंदच आहे. मात्र त्यांची विचारधारा भिन्न आहे. त्यांच्या एकत्र येण्याने राष्ट्रवादी वा काँग्रेसला फटका बसणार नाही.
नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंडे यांची मध्यस्थीची तयारी

शिवसेनेची तयारी असेल तर राज आणि उद्धव यांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थी करण्याची आपली तयारी आहे, असे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटले आहे. उद्धव यांनी मनातील गोष्ट बोलून दाखवली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष सोबत येतील अशी आशा करणे गैर ठरणार नाही, असे गोपीनाथ मुंडे यांनी म्हटले आहे.

रिपाइंची मात्र हरकत

राज ठाकरे युतीत आले तरी काही फायदा होणार नाही. असे असतानाही कोणी राज यांना महायुतीत आणण्याचा प्रस्ताव ठेवत असेल तर रिपाइंने महायुतीत राहावे की नाही याबाबत मला कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल, असे रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

फोटोला क्लिक करुन वाचा, ‘राज’मैत्रीमुळेच शिवसेनेकडून नरेंद्र मोदींच्या नावाला विरोध!