आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या गट क्रमांक ५५/२, ५६/२, ५४ पैकी ४९ ठिकाणी शेतजमिनी आहेत. शेतात जाण्यासाठी रस्ता खुला करून मिळावा, अशी त्यांची अनेक वर्षांची मागणी आहे. रस्ता देता येत नसेल, तर आमच्या शेतजमिनी संपादित करून घ्याव्यात, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शनिवारी तहसील कार्यालयात दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांची तहसीलदार दीपक पाटील यांनी चर्चा घडवून आणली. मात्र, काहीच निष्पन्न झाले नसल्याने पाण्यात बसून आंदोलन सुरू करण्यात आले. अनिकेत गोसावी, दत्तात्रेय माळवदे, भगवान काळे यांनी पाण्यात बसून उपोषण सुरू केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.