आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक- किसान सभेच्या नेतृत्त्वात नाशिकहून मुंबईच्या दिशेने लॉंगमार्च निघाला आहे. नाशिकपासून सुरु झालेला हा मोर्चा 12 तारखेला विधिमंडळावर धडकणार आहे. हजारो शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चात सहभागी झाले आहेत.
सरकारी धोरणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. सरकार पाठीशी उभे राहत नसल्याने शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. सरकारने दिलेली कर्जमाफीही फसवी असल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी किसान सभेने मोर्चाचे हत्यार उपसले आहे.
कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात. शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती द्या. शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या. स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा. वन अधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा, अशा मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.