आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेवला - तालुक्यातील उंदीरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सातवीच्या विद्यार्थी महेश रोहम याचे सोमवारी अपहरण झाले. परंतु, त्याने प्रसंगावधान राखत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. त्याच्या धैर्याचे परिसरात कौतुक होत आहे.
सोमवारी शाळा सुटल्यानंतर 11 वाजता महेश आडगाव शिवारातील कोटमगाव रस्त्यावरील आपल्या मळ्यात गेला. एक वाजेपर्यंत मळ्यात थांबल्यानंतर सायकलवरून पुन्हा उंदीरवाडी गावात आला. दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास कोटमगाव रस्त्यावरच दुसर्या मळ्यातील घरी जात असताना पाठीमागून स्कॉर्पिओतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यास रस्ता विचारला. त्यानंतर किराणा दुकान कुठे आहे, असे विचारले.
त्यानंतर महेशने पळ काढताच 3 ते 4 अपहरणकर्त्यांनी पाठलाग करीत त्याच्या तोंडावर स्प्रेचा मारा केला व चौघांनी त्याला स्कॉर्पिओ गाडीत टाकून वैजापूरकडे पलायन केले. वैजापूरच्या पुढे गेल्यानंतर नागपूर राज्य महामार्गावर अपहरणकर्त्यांनी चहा पिण्यासाठी गाडी एका हॉटेलवर थांबवली. हॉटेलवर चारही अपहरणकर्ते चहा पिण्यात मश्गुल असताना गाडीत बसलेल्या महेशने धैर्याने गाडीचा दरवाजा उघडून हॉटेलकडे पळ काढला. अपह्त बालक महेश तावडीतून सुटल्याचे बघून अपहरणकर्त्यांनी हॉटेलवर कुठलाही गाजावाजा न करता स्कॉर्पिओ गाडी घेऊन राज्य महामार्गानेच पलायन केले. महेश रोहमने सुमारे दोन तासानंतर वडील राजेंद्र बापू रोहम यांचा मोबाईल नंबर आठवून हॉटेल मालकाला सांगितला. रात्री नऊ वाजाता हॉटेल मालकाने संपर्क साधल्यानंतर अपह्त बालक महेश व वडील राजेंद्र रोहम यांची अखेर भेट झाली. 7 तासांच्या या अपहरणनाट्याचा अखेर महेशच्या धैर्यामुळे झाल्याने सर्वांनीच नि:श्वास सोडला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.