आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- वीजपुरवठ्यातप्रीपेड मीटर सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा शासनाचा विचार असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना येथे दिली. प्रत्येक घराला वीज देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘सौभाग्य’ योजनेचे उद््घाटन सिंग यांच्या हस्ते येथे झाले.
आवश्यकतेप्रमाणे वीजही आता रिचार्ज करता येईल. जेवढे पैसे भरले तेवढी वीज वापरता येणार आहे. बिल भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. रिचार्ज केले नाही तर मोबाइल, टीव्हीच्या सेवा बंद होतात. त्याचप्रमाणे रिचार्ज भरले नाही तर मीटरमधून वीजपुरवठा खंडित होईल. अधिक वीज वापर असलेल्यांसाठी स्मार्ट मीटर वापरात आणले जाणार आहे. या मीटरमध्येही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून मीटरमध्ये फेरफार करता येणे शक्य होणार नाही. घरात वीजपुरवठ्यात बेकायदा बदल केले तर त्याची माहिती थेट वीज कार्यालयाला या मीटरच्या माध्यमातून होऊ शकेल, अशी माहितीही सिंग यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.