नागपूर - महाराष्ट्रातील नद्या, पर्वत आणि इतर स्थळांचा रामायण, महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. परंतु, विश्वसनीय ऐतिहासिक साधने वापरून लिहिलेला महाराष्ट्राचा इतिहास इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून उपलब्ध आहे. राजकीय कालखंडानुसार महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मोगल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्लिश लोक, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते. यातील वाकाटक हे महत्त्वाचे राजघराने. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात इस.२५०-५२५ या काळात वाकाटकाची सत्ता होती. त्यावेळी या राजघराण्याची राजधानी होते आताचे वाशीम आणि नागपूर जिल्ह्यातील नगरधन. त्याची खास माहिती divymarathi.com च्या वाचकांसाठी...
पुढील स्लाइडवर वाचा वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ.....