अमरावती - मूलहोत नसल्याने तसेच लग्नात आंदन कमी दिल्याचे कारण पुढे करीत विवाहित महिलेचा छळ केल्या जात असल्याची घटना वर्धा जिल्ह्यातील नेरी पूनर्वसन येथे घडली.
घरातून निघून जा असे म्हणत मारहाण करीत शारीरिक मानसिक छळ केल्या जात असल्याचे महिलेच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. महिलेच्या तक्रारीवरुन स्थानिक फ्रेजरपुरा पोलिसांनी वर्धा जिल्ह्यातील नेरी पूनर्वसन येथील नामदेव मारोतराव वाळके, चांदूर रेल्वे येथील मुकुंद माराेतराव वाळके तसेच नागपूर शिंदी येथील अरविंद माराेतराव वाळके यांच्यासह चार महिलांिवरोधात भादंविच्या ४८३(अ), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चार महिलांविरोधात गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.