आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीरामपूर - बाजारसमितीमधील गाळ्यांचा लिलाव शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बंद पाडला. अखेर चर्चेसाठी राजी झालेल्या संचालक मंडळाने चार गाळे शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. बाजार समितीचे पदाधिकारी किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर असणारे गाळे खाली केले जाणार आहेत.
शेतकरी संघटनेचे नेते जितेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते सकाळीच बाजार समितीच्या आवारात जमा झाले. शेकडो कार्यकर्ते जमल्याने मोठा तणाव निर्माण झाला. सभापती सचिन गुजर यांच्यासह संचालक यावेळी उपस्थित होते. आवारातील भाजीपाला, फळविक्रीसाठी बांधलेले गाळे आडते व्यापाऱ्यांना देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, बाहेरची दुकाने शेतकऱ्यांनाच द्यावी, अशी जोरदार मागणी संघटनेने केली. चर्चेअंती ती मान्य झाली.
गोदामाअभावी शेतमाल खरेदी केंद्र सुरू करता येत नसताना पदाधिकारी मात्र केवळ गाळे बांधण्याचा अट्टहास करतात. बेलापूर उपआवारातील गोदाम पाडून शॉपिंग सेंटर उभारण्याचा निर्णयदेखील आंदोलनाच्या रेट्यामुळे संचालक मंडळाला रद्द करावा लागला. शेतीपूरक कामे सोडून अन्य व्यवसायांकरिता दुकानांचा वापर होतो. ती खाली करावीत, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली. ती संचालक मंडळाने मान्य केली. बाजार समितीत शीतगृह (कोल्ड स्टोअरेज) उभारणीचा निर्णय यावेळी घेण्यात आला. शेतकऱ्यांना पडलेल्या दरात शेतमाल विकावा लागतो पुढील काळात त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.