आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - पाणी भरण्याच्या वादातून गाजीनगर येथील सप्तपदी मंगल कार्यालयाजवळच्या सार्वजनिक नळावर 17 मार्चला सायंकाळी मारामारी झाली. रुक्मिणीबाई किसन थोरात यांच्या फिर्यादीवरून सना अकबर खान व अकबर अजगर खान यांच्याविरुद्ध कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंबर लावून पाणी भरत असताना खान दाम्पत्याने मुलगा रडत असल्याचे कारण सांगून पाणी भरू देण्याची विनंती केली. याला थोरात यांनी नकार दिला. त्यावरून शिवीगाळ व मारहाण झाली. थोरातांची सून सुनीता भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडल्या असता त्यांनाही मारहाण झाली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सना अकबर खान यांनीही अशाच आशयाची फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून रुक्मिणीबाई थोरात व सुनीता थोरात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.