नवी दिल्ली- मुंबई, महाराष्ट्राने विजय हजारे ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेत शानदार विजय संपादन केले. दुसरीकडे विदर्भ अाणि झारखंडला पराभवाचा सामना करावा लागला. हरभजनच्या नेतृत्वात पंजाबने शनिवारी अ गटात विदर्भावर ६ गड्यांनी मात केली. कर्नाटकने धाेनीच्या झारखंडला ५ धावांनी हरवले. विदर्भाने २१८ धावा काढल्या हाेत्या.
प्रत्युत्तरात पंजाबने ४१.३ षटकांत सामना जिंकला. मुंबईने गुजरातला ९८ धावांनी हरवले. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २७३ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात गुजरातचा १७५ धावांत खुर्दा उडाला.
झाेलच्या अर्धशतकाने महाराष्ट् विजयी : विजय झाेल (२) व ऋतुराजच्या (१३२)बळावर महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशवर २५ धावांनी मात केली. जळगावच्या जगदीश झाेपे (४/६०) व श्रीकांत मुंढेने (३/७५) महाराष्ट्राला विजय मिळवून दिला.