नवी दिल्ली- सोमवारी भारतीय लष्करात अत्याधुनिक आकाश क्षेपणास्त्र प्रणाली दाखल होण्याची शक्यता आहे. शत्रूची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स व ड्रोनचा हे क्षेपणास्त्र सहज वेध घेऊ शकते. आकाशातील कवच, असे याचे वर्णन केले जाते. विशेष म्हणजे मोबाईल लाँचरनेही हे ९६ टक्के स्वदेशी क्षेपणास्त्र डागता येऊ शकते.
> आवाजाच्या वेगापेक्षा अडीच पट वेग
> 30 किमी रेंजमध्ये येणारी विमाने पाडण्याची क्षमता
> 18 किमी उंचीपर्यंत उड्डाण घेऊ शकते.
> 5 विमानांवर एकाच वेळी हल्ला करण्याची क्षमता
> 100 लक्ष्यांवर एका वेळी लक्ष ठेऊ शकते.