आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - सनाउल्लाह रंजयलाच्या शिक्षेचा कालावधी बाकी असल्याने त्याला मायदेशी पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तानी कैद्याला मायदेशी पाठवण्याच्या मागणीला फेटाळून लावले आहे. वर जम्मू तुरुंगात झालेला हल्ला रोखण्यासाठी पावले का उचलली नाहीत, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र व राज्य सरकारकडे केली. सनाउल्लाह शिक्षेचा कालावधी संपलेला नसल्यामुळे त्याचे पाकिस्तानमध्ये प्रत्यार्पण करण्याची मागणी फेटाळण्यात आली. सनाउल्लाह वर 3 मे रोजी झालेला हल्ला रोखण्यासाठी का पावले उचलली नाहीत, असे न्या. आर. एम. लोढा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. या प्रकरणाला जबाबदार तुरुंग अधिकाºयांची व सुरक्षेची माहिती मागण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.