आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- केंद्र सरकार बुधवारी अखेरचा रेल्वे अर्थसंकल्प सादर करील. हे हंगामी अंदाजपत्रक असले तरी निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे लोकांना खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. भाडे कमी होणे दुरापास्त आहे, पण काही नव्या रेल्वेगाड्यांची घोषणा होऊ शकते.
मल्लिकार्जुन खारगे यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून, गाड्यांची घोषणा करताना आघाडीतील सर्व घटक पक्षांकडे त्यांना लक्ष ठेवावे लागणार आहे. नव्या रेल्वेगाड्या, गाड्यांचा विस्तार, अचूक माहिती देण्याच्या दृष्टीने माहिती व्यवस्थेत सुधारणा अशा घोषणा असतील. रेल्वेचा खर्च वाढत असल्याची मोठी अडचण खारगे यांच्यासमोर आहे. एप्रिल-डिसेंबरदरम्यान खर्च बजेटपेक्षा 5 हजार कोटींनी वाढला आहे. याशिवाय उत्पन्नात 3 हजार कोटींची घसरण झाली आहे. मालवाहतुकीचेही निर्धारित उद्दिष्ट पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे मोठा दिलासा मिळणे कठीण आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.