नवी दिल्ली- आई वडिलांवरहल्ला होताना मुलांनी केलेला बळाचा वापर कायदेशीर होऊ शकतो, असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला शेजाऱ्यावर हल्ला केल्याच्या आरोपातून दोन भावांची निर्दोष मुक्तता केली. या घटनेत या मुलांच्या वडिलाचा नंतर मृत्यू झाला होता.
न्यायमूर्ती दीपक मिश्रा न्यायमूर्ती शिवकीर्ती सिंह यांच्या न्यायपीठाने म्हटले की, आपल्या आईवडिलांवर हल्ला होत असल्याचे पाहून बळाचा वापर करण्याच्या अधिकाराचा कायदेशीर दावा मुले करू शकतात. न्यायपीठाने वडिलांवर हल्ला करणाऱ्या शेजाऱ्याला मारहाणीच्या आरोपाखाली दोन भावांची दोषसिद्धी आणि दोन वर्षांची शिक्षा रद्द केली. कनिष्ठ न्यायालयाने या दोन्ही भावांना दोघांच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते. परंतु राजस्थान न्यायालयाने त्यांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले होते. त्याला या दोन भावांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अभियोजन पक्षाचा दावा खोटा असून त्यांनी आपल्या आईवडिलांना मारहाण केली. त्यात वडिलांचा मृत्यू झाला, हे साक्षीसह दोन्ही भावांनी पटवून दिले.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)