मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एक हॉटेल व्यावसायिक कुटूंब बगदरी धबधब्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात तीन चिमुरडे, पाच महिलांसह 11 जणांना प्राण्ा गेला आहे. या अपघाताने 17 जुलै 2011 रोजी इंदूरच्या पाताळपाणी येथे झालेल्या अपघाताची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.
पाताळपाणी अपघातामध्ये पूर्ण परिवार वाहून गेला होता. चंद्शेख राठी आपल्या मुलांना भेटण्यासाठी पत्नी सुमन सोबत इंदूरला आले होते. आपल्या मुलांना घेऊन राठी हे पिकनिकसाठी पाताळपाणी याठिकाणी गेले होते. अचानक पाणी वाढल्यामुळे राठी कुटुंबावर काळाने घाव घातला होता.
पाताळपाणी बीचवर एक उंच दगड आहे. या दगडावर बसून अनेक पर्यटक फोटो घेतात. राठी परिवार फोटो काढण्यासाठी या दगडावर गेला. अचानक पाणी वाढल्यामुळे राठी यांच्या पुर्ण परिवारचा अंत झाला.
पुढील स्लाईडवर पाहा या घटनेचे जिवाचा थरकाप उडवणारे फोटो.......