जयपूर - निर्मलादेवी ट्रस्टतर्फे शनिवारी मानसरोवर व्हीटी रोडवर महर्षि अरविंद इन्स्टीट्यूटसमोर सहजयोग केंद्रात आंतरजातीय सामुहिक
विवाह संमेलनात 42 जोडप्यांचे सामुहिक विवाह झाले. तर इतर दोडप्यांचा विवाह डिसेंबरमध्ये होणार आहे. संमेलनात भारताच्या विविध राज्याशिवाय 10 विदेशी जोडपे रशियन, ब्राझिल, मलेशिया, फ्रान्स, स्विडन, अमेरिका, नेपाळ, जर्मनी, ऑस्ट्रीया, मालदीव, कॅनाडा इत्यादी विविध ठिकाणावरून आलेल्या तरूण तरूणींनी या संमेलनात सहभाग नोंदवला. या संमेलनात जवळपास 10,000 साधकांनी भाग घेतला होता.