गेल्या वर्षी झाली होती 44 वर्षांतील सर्वाधिक फायरिंग
गेल्या वर्षी ऑगस्टनंतर पाकिस्ताकडून करण्यात आलेल्या फायरिंगमुळे एलओसीच्या जवळपास असलेल्या गावांतील 32 हजार नागरिकांना घर सोडून जावे लागले होते. 1971 नंतर प्रथमच बॉर्डर आणि एलओसीवर पाकिस्तानकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर फायरिंग झाली होती.
इंटरनेशनल बॉर्डर आणि एलओसी..
पाकिस्तानला लागून असलेली भारताची इंटरनॅशनल बॉर्डर 2313 किलोमीटर लांबीची आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये एलओसी 772 किलोमीटर लांब आहे. इंटरनॅशनल बॉर्डरवर बीएसएफचा पहारा असतो. तर एलओसीवर आर्मीचे जवान तैनात असतात. पाकिस्तानकडून इंटरनॅशनल बॉर्डरवर बीएसएफच्या चौक्यांना जास्त प्रमाणात लक्ष्य केले जाते.
12 वर्षांपूर्वी झाली होती शस्त्रसंधी
भारत-पाकिस्तानदरम्यान सीजफायर अॅग्रीमेंट नोव्हेंबर 2003 मध्ये झाले होते. बॉर्डर आणि एलओसीवर फायरिंग करणार नाही, असे यात नमूद करण्यात आले होते. पण पाकने दरवर्षी अनेकदा या शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यापूर्वी 1949 मध्ये कराचीमध्ये करारानंतर शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. नंतर वाजपेयी सरकारच्या काळात 2003 मध्ये पुन्हा शस्त्रसंधी लागू करण्यात आली.