इंफाळ- देशातील ईशान्य, उत्तरेकडील राज्यांत गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे निम्म्या देशांत पाणीच पाणी झाले आहे. मणिपूरमधील मोठा प्रदेश जलमय बनला आहे.
शनिवारी हेलिकॉप्टरमधून अनेक गावांत पूर आल्याचे दिसून येते. आसाममधील शेकडो गावांना पुराचा तडाखा बसला शनिवारी ७ जणांचा मृत्यू झाला. पुरामुळे १२ लाख लोकांना फटका बसला आहे. हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.