आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशुक्रवारी सकाळी विशेष विमानातून रांची मधील बिरसा मुंडा विमानतळावर सुरक्षेच्या घे-यात राहूल गांधी पोहोचले. ठरलेलल्या वेळेनंतर 15 मिनिटांनी राहूल रांचीमध्ये पोहोचले. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते विमानस्थळावर उपस्थित होते.
सकाळपासूनच या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. एसपीजी, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप अधिक-यांसोबतच सीआयएसएफ आणि जॅप आधिका-यांनी पूर्ण विमानतळच सुरक्षेसाठी ताब्यात घेतले होते. सशस्त्र जवानांसोबतच बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वार्ड विमानतळच्या आत आणि बाहेर चेकिंग करण्यात व्यस्त होते.
सफारी आणि एस्कॉर्ट गाडीला आत पाठवले-
विमानाच्या आगमनापूर्वीच एसपीजी अधीका-याने एक सफारी आणि एक एस्कॉर्ट गाडी विमानतळाच्या आत पाठवली. त्यानंतर बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वार्डला आत पाठवण्यात आले. त्यांनी आत जाऊन सगळे व्यवस्थित असल्याची खात्री करून घेतली. या पथकांनी सगळे काही आलबेल असल्याचा इशारा दिल्यानंतर राहूल गांधी विमानतळाच्या बाहेर आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.