नवी दिल्ली - अब्रू नुकसानीच्या कायद्यातील शिक्षेच्या दोन तरतुदींना आव्हान देणारी याचिका भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी मंगळवारी दाखल केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडून चार आठवड्यांत उत्तर मागवण्यात आले आहे. पुढील सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे. स्वामी यांच्या विरोधात तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुक प्रमुख जे.
जयललिता यांच्या गटाकडून मानहानीचे खटले सुरू आहेत.