आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीत एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह एकाच घरात सापडल्याने देशभर खळबळ उडाली आहे. ही घटना सामुहिक आत्महत्येचा प्रकार असावा असे सांगण्यात येत आहे परंतु काही प्रश्न अजूनही अनुत्तरीत असले तरी, तपासात सापडलेल्या काही पुराव्यांच्या आधारे ही आत्महत्या वाटत आहे. मोक्ष प्राप्तीसाठी या सर्वांनी आत्महत्या केली असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे परंतु आत्महत्या केल्याने खरंच मोक्ष मिळतो का? या संदर्भात हिंदू धर्मामध्ये काय सांगण्यात आले आहे, याविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
स्वर्ग आणि नर्क
हिंदू धर्म मान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर यमदेवाचे दूत मृत व्यक्तीचा आत्मा यमलोकात घेऊन जातात. तेथे आत्म्यासाठी दोन द्वार असतात- स्वर्ग आणि नर्क. मृत व्यक्तीच्या कर्मानुसार निश्चित केले जाते की, त्याला स्वर्ग (चांगले कर्म केले असतील तर) मिळणार की नर्क (वाईट कर्म). परंतु आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला हा नियम लागू होतो का?
जीवनातील सर्वात मोठी चूक
आत्महत्या करणे जीवनातील सर्वात मोठी चूक मानली जाते. व्यक्ती आत्महत्येचा मार्ग तेव्हाच निवडतो, जेव्हा त्याच्याकडे जीवनात करण्यासाठी काहीही नसते किंवा त्याने जीवन जगण्याची आशा सोडून दिलेली असते. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला वाटते की, जीव संपवल्यानंतर सर्व कष्टानुन मुक्ती मिळेल परंतु हा विचार अत्यंत चुकीचा आहे. कारण आत्महत्या केल्यानंतर व्यक्तीचे दुःख संपत नाहीत तर आणखी जास्त वाढतात.
पुढील स्लाईड्सवर वाचा आत्महत्या केल्यानंतर कोणत्या ठिकाणी जातो आत्मा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.