आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गरुड पुराणातील आचार कांडमध्ये आपण कोणत्या 10 लोकांच्या घरी जेवण करू नये, याविषयी सांगण्यात आले आहे. या लोकांच्या घरी आपण अन्न ग्रहण केल्यास आपल्या पापांमध्ये वृद्धी होते. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या 10 लोकांच्या घरी जेवण करू नये.
खूप रागीट व्यक्ती
क्रोध मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेकदा क्रोधाच्या आवेशात येउन व्यक्ती चांगल्या आणि वाईट गोष्टीमधील फरक विसरून जातो. याच कारणामुळे व्यक्तीला नंतर पश्चातापाला सामोरे जावे लागते. जे लोक नेहमी रागात राहतात अशा लोकांचा घरी चुकूनही जेवण करू नये. याच्या घरी जेवण केल्यास त्यांच्या क्रोधाचे गुण आपल्यामध्ये प्रवेश करू शकतात.
आम्ली पदार्थ विकणारा
नाश करणे पाप श्रेणीमध्ये येते आणि जे लोक आम्ली पदार्थांचा व्यापार करतात अशा लोकांच्या घरी जेवण करू नये, असे गरुड पुराणात सांगण्यात आले आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक कुटुंब उध्वस्त होतात. याचा दोष व्यसनी पदार्थ विकारणाऱ्या व्यक्तीलाही लागतो. अशा लोकांच्या घरी जेवण केल्याने त्यांच्या पापाचा प्रभाव आपल्या आयुष्यावरही पडतो.
पुढे जाणून घ्या, आणखी कोणकोणत्या 9 लोकांच्या घरी जेवण करू नये...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.