आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाभारत युद्धानंतर अश्वत्थामाने मध्यरात्री पांडवांच्या सर्व मुलांचा वध केला होता, हे सर्वांना माहिती असेलच परंतु त्यानंतर काय-काय घडले याचे वर्णन भविष्यपुराणात करण्यात आले आहे.
भविष्य पुराणानुसार, मध्यरात्री अश्वत्थामा, कृतवर्मा आणि कृपाचार्य पांडवांच्या शिबिराजवळ गेले आणि त्यांनी मनातल्या मनात महादेवाचे स्मरण करून त्यांना प्रसन्न केले. त्यानंतर महादेवांनी त्यांना पांडवांच्या शिबिरात प्रवेश करण्याची परवानगी दिली. त्यानंतर अश्वत्थामाने पांडवांच्या शिबिरात घुसून महादेवाकडून प्राप्त तलवारीने सर्व पांडव पुत्रांचा वध केला.
पांडवांना ही घटना समजताच त्यांनी हे सर्वकाही महादेवांमुळेच घडले आहे असे समजून त्यांच्याशी महादेवांशी युद्ध करण्याचा निश्चय केला. पांडव युद्ध करण्यासाठी महादेवांच्या समोर पोहोचल्यानंतर त्यांचे सर्व अस्त्र-शस्त्र महादेवांमध्ये सामावून गेले आणि त्यानंतर महादेव त्यांना सांगितले की तुम्ही सर्व श्रीकृष्णाचे उपासक आहात, त्यामुळे या जन्मात तुम्हाला या पापाचे फळ मिळणार नाही. परंतु याचे फळ तुम्हाला कलियुगात जन्म घेऊन भिगावे लागेल.
महादेवाचे हे वाक्य ऐकून सर्व पांडव दुःखी झाले आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी श्रीकृष्णाकडे पोहोचले. तेव्हा श्रीकृष्णाने पांडवांना ते कलियुगात कुठे आणि कोणाचा घरात जन्म घेतील हे सांगितले.
पुढे, ग्राफिक्समध्ये जाणून घ्या, कोणत्या पांडवाने कलियुगात कुठे आणि कोणत्या नावाने जन्म घेतला होता...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.