चैत्र महिन्याच्या पोर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. या वेळी 22 एप्रिल, शुक्रवारी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला हनुमानासंबंधीत काही रंजक गोष्टी सांगणार आहोत. महाभारता प्रमाणे, युध्दाच्या वेळी अर्जुनाच्या रथावर स्वयं हनुमान विराजित होते. युध्द समाप्त झाल्यावर काय झाले आणि का हनुमान अर्जुनाच्या रथावर विराजित होते. हे आम्ही सांगत आहोत...
यामुळे जळाला अर्जुनाचा रथ
महाभारता प्रमाणे जेव्हा कौरव सेनेचा नाश झाला तेव्हा दुर्योधन पळून एका तलावात लपला. जेव्हा पांडवांना ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांना दुर्योधनाला युध्दासाठी आव्हान केले. दुर्योधन तलावातून बाहेर निघाला आणि भीमने त्याला पराजित केले. दुर्योधनाला मरणासन्न अवस्थेत सोडून पांडव आपआपल्या रथांमध्ये कौरवांच्या शिविरमध्ये आले. तेव्हा श्रीकृष्णने अर्जुनाला अगोदर रथातुन उतरायला सांगितले आणि नंतर ते स्वयं उतरले.
श्रीकृष्ण उतल्यावर अर्जुनाच्या रथावर बसलेले हनुमान देखील उडून गेले. तेव्हा एका क्षणात अर्जुनाचा रथ जळून खाक झाला. हे पाहून अर्जुनाने श्रीकृष्णाला याचे कारण विचारले? तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की, हा रथ दिव्यास्त्रांच्या प्रहाराने अगोदरच जळाला होता. फक्त मी बसलेलो असल्यामुळेच हा रथ भस्म झाला नव्हता. जेव्हा तुमचे काम पुर्ण झाले तेव्हाच मी हा रथ सोडला. यामुळे आता हा रथ भस्म झाला.
हनुमानाने भीमला वचन दिले होते की, जेव्हा कौरव पांडवांमध्ये युध्द होईल तेव्हा ते अर्जुनाच्या रथावर बसुन शत्रूंना भयभीत करतील. हनुमान आणि भीम कोठे भेटले हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...