महर्षी वेदव्यास रचित महाभारत ग्रंथामध्ये विविध प्रमुख पात्र असून भीष्म पितामह त्यामधील एक आहेत. भीष्म पितामह एकमेव असे पात्र आहेत, जे महाभारताच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपस्थित होते. आज (4 फेब्रुवारी, शनिवार) भीष्माष्टमी आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला पितामह भीष्म यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत, या गोष्टी फार कमी लोकांना ठाऊक असाव्यात.