वडील आणि मुलांचे नाते खुपच खास असते. वडील आणि मुलांचे नाते अजूनच मजबूत करण्यासाठी प्रत्येक वर्षाच्या जून महिन्याच्या तिस-या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. या वर्षी फादर्स डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला धर्म ग्रंथात सांगितलेल्या काही अशा वडीलांविषयी सांगत आहोत जे थोडे वेगळे आहेत.
राजा शांतनु - पुत्राला दिले इच्छा मृत्यूचे वरदान
महाभारतानुसार राजा शांतनु भीष्माचे पिता होते. जेव्हा राजा शांतनु निषादची कन्या सत्यवतीवर मोहित झाले तेव्हा ते विवाहाचा प्रस्ताव घेऊन तिच्या वडीलांजवळ गेले. सत्यवतीच्या वडीलांनी राजा शांतनुकडून वरदान मागितले की, त्यांच्या पुत्रीचे
आपत्यच राजा बनेल. तेव्हा शांतनुने नकार दिला. जेव्हा भीष्माला हे कळाले तेव्हा ते सत्यवतीच्या वडीलांजवळ आले आणि वचन दिले की, ते आजीवन ब्रम्हचारी राहतील आणि सत्यवतीचे आपत्य राजा बनेले. अशा प्रकारे त्यांनी आपल्या वडिलांची इच्छा पुर्ण केली. प्रसन्न होऊन राजा शांतनुने भीष्माला इच्छा मृत्यूचे वरदान दिले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काही अशाच वडिलांविषयी...