महाभारतामध्ये एक दृष्टांत सांगण्यात आला आहे. महाराज धृतराष्ट्र यांना झोप लागत नव्हती. व्याकुळ असल्यामुळे मनात वेगवेगळे विचार येत होते. काही सुचत नसल्यामुळे महराजांनी महामंत्री विदुराला बोलवले. काही वेळात विदुर महाराजाकडे आले. महाराजांनी विदुराला सांगितले, संजय पांडवांना भेटून आल्यापासून माझी झोप उडाली आहे. संजयने भर सभेमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या तेव्हापासून मी बेचैन आहे. माझी झोप उडाल्यासारखे वाटत आहे.
माहाराजांची बेचैनी पाहून विदूराने महाराज धृतराष्ट्राला चार नीतिच्या गोष्टी सांगितल्या. विदुर म्हणाले कोणतीही व्यक्ती असो, मग स्त्री असो किंवा पुरूष, प्रत्येकाच्या आयुष्यात या चार गोष्टी घडत असतात. ज्यामुळे प्रत्येकाची झोप उडते. आज आम्ही आपल्याला या गोष्टीविषयी माहिती देणार आहोत. ज्या गोष्टी विदुराने महाराज धृतराष्ट्राला सांगितल्या.
जाणून घ्या काय आहेत चार गोष्टी-
पहिली गोष्ट-
विदुराने महाराज धृतराष्ट्राला सांगितले. जर एखाद्या व्यक्तिच्या मनात कामभाव निर्माण झाला तर त्याला झोप लागत नाही. काम भावना व्यक्तीला अशांत करते. तो सैरभैर होतो. त्याला इतर काही सुचत नाही. अशा वेळी त्या व्यक्तिला झोप लागत नाही. कोणतेच कार्य तो चांगल्याप्रकारे पार पाडू शकत नाही. कामभावना ही स्त्री आणि पुरूष या दोघांमध्ये असते.
पुढील स्लाईडवर वाच महत्वाच्या तिन गोष्टी...