नऊ रात्री अंबेचा जागर झाल्यानंतर दहावा दिवस असतो विजयादशमीचा. सोने लुटण्याचा. दस-याच्या दिवशी लोक एकत्र येतात.
आपटा व शमीच्या पानांमुळे अर्जुन योग येतो. आपल्याला विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा यासाठी दस-याला सोने लुटले जाते. पुराणामध्ये सीमोल्लंघन, सोने लुटणे या संदर्भात विविध कथा सांगण्यात आल्या आहेत. येथे जाणून घ्या, दसर्याला आपटा व शमीच्या पानांना का विशेष महत्त्व आहे...
रघुराजाच्या काळची पुराण कथा आहे, वरतंतू ऋषींचा शिष्य कौत्स. चौदा विद्यामंध्ये त्याने प्रावीण्य संपादन केले. गुरूऋणातून उतराई होण्यासाठी त्याने गुरुदक्षिणेबद्दल विचारले. विद्या लोकांच्या कल्याणासाठीच उपयोगात आण हीच माझी गुरू दक्षिणा, असे गुरूने सांगितले. मात्र शिष्याने जास्तच आग्रह केला. तेव्हा गुरूंनी सांगितले की, चौदा विद्यांच्या बदल्यात चौदा कोटी सुवर्णमुद्रा दे. गुरूंना वाटले कौत्स आता गुरूदक्षिणेचा नाद सोडून देईल.
कथेचा शेष भाग वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...