अनेक वर्षानुवर्षांच्या ऋषी-मुनींच्या अनुभवाआधारे एक गोष्ट स्पष्ट आहे की, मानव आत्म्याची व्यक्तिगत अशांती ही समाजातील सामूहिक अशांततेचे कारण आहे. काम, क्रोध, लोभ, मोह आणि अशुद्ध अहंकार या पाच विकारांच्या आहारी जाऊन मनुष्य इतक्या खालच्या थराला गेला आहे की, तो प्रत्येक वेळी काही ना काही अकल्याणकारी कार्य करतच असतो. परंतु, विधिलिखित आज संपूर्ण संसार याच पाच विकारांच्या गुंत्यात अडकून पडला आहे. यालाच
आपले सुख, समाधान समजत आहे. दुसर्याचे वाईट करण्याची इच्छा मनुष्याला पळवत आहे.