गुरु द्रोण आपला मुलगा अश्वत्थामावर फार प्रेम करत असे. याकारणामुळे ते शिक्षणामध्ये अश्वत्थामाला झुकते माप द्यायचे आणि इतर शिष्यांसोबत भेदभाव करायचे. एकदा त्यांना सर्व कौरव आणि पांडव राजपुत्रांना चक्रव्यूहची रचना आणि त्याला भेदण्याची पद्धत शिकवायची होती. यासाठी त्यांनी एक अट ठेवली की, जो राजपुत्र नदीवरुन सर्वात आधी मडके भरुन आणील त्यालाच ही पद्धत शिकवली जाईल. सर्व राजपुत्रांना मोठ्या आकाराचे मडके दिले जाते. मात्र पुत्रप्रेमामुळे द्रोणाचार्य अश्वत्थामाला छोटे मडके देतात, जेणेकरुन त्याला सर्वात आधी येता येईल. अर्जुनाला हे समजते. त्यामुळे तोही भराभर मडके भरुन अश्वत्थामासोबत द्रोणाचार्याजवळ पोहोचतो. त्यामुळे द्रोणाचार्य दोघांनाही ही विद्या शिकवतात.
पुढील स्लाइडवर वाचा, गुरु द्रोणाचार्याची ती चुक ज्यामुळे अश्वत्थामाला मिळाला शाप...