हिंदू धर्म ग्रंथामध्ये सांगितलेल्या विविध गोष्टी
आपल्यासाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाहीत, परंतु धर्म ग्रंथाचे वाचन न केल्यामुळे आपण या गोष्टींपासून अनभिज्ञ राहतो. प्राचीन ग्रंथानुसार पूर्वी मनुष्याचे आयुष्य 100 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असायचे परंतु सध्याच्या काळात मनुष्याच्या आयुष्यामध्ये घट झालेली दिसून येत आहे.
याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्याद्वारे दररोज करण्यात येणारी काही कामे, ज्यामुळे मनुष्याचे आयुष्य कमी होत चालले आहे. महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये मनुष्याचे आयुष्य वाढवणारे आणि कमी करणारे कर्म यासंबंधी सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे. या गोष्टी भीष्म पितामह यांनी युधिष्टिराला सांगितल्या होत्या.
1- महाभारतानुसार, जो मनुष्य नखं कुरतडतो तसेच नेहमी अशुद्ध आणि चंचल राहतो, त्याचे आयुष्य लवकरच समाप्त होते. उदय, अस्त, ग्रहण व दिवसा सूर्याकडे पाहणाऱ्या मनुष्याचा मृत्यू अल्पायुतच होतो.
2- क्रोधहीन, नेहमी सत्य बोलणारा, हिंसा न करणारा, सर्वांना एकसमान वागणूक देणार्या मनुष्याचे आयुष्य १०० वर्षांचे असते. दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्म झाल्यानंतर प्रातःकाळी आणि संध्याकाळी विधीपूर्वक संध्या करणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य जास्त असते.
कोणकोणती कामे केल्याने मनुष्याचे आयुष्य वाढते किंवा घटते हे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...