आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आपण दैनंदिन जीवनात अऩेक चुका करत असतो. या चुका आपल्याला सामान्य वाटतात, परंतू भविष्यात याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. या लहान-लहान चुकांमुळे आपले दुर्भाग्य वाढते आणि सौभाग्य कमी होते. याच कारणामुळेआपले कोणतेच काम पुर्ण होत नाही आणि त्याचा सकारात्मक परिणाम मिळत नाही.
उज्जैनच्या ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्टनुसार, आज आम्ही तुम्हाला अशाच काही कामांविषयी सांगणार आहोत. जे केल्याने आपल्या आयुष्यात अडचणी सुरु असतात. आपण दैनंदिन जीवनात या गोष्टी लक्षात ठेवल्या तर वाईट काळात दूर होऊ शकतो आणि आपल्या जीवनात चैतन्य येऊ शकते. ती कामे खालीलप्रमाणे आहेत.
1. ताटात कधीच उष्ठे सोडून नये. असे केल्याने घरातील बरकत कमी होते.
2. सकाळी अंघोळ केल्याशिवाय पूजेचे फुलं किंवा तुळशीचे पानं तोडू नये. यामुळे जीवनातील अडचणी वाढतात.
3. पलंगावर बसून जेवण करु नये. असे केल्याने जीवनात पैशांची कमतरता निर्माण होते.
4. रात्री कधीच भांडी न घासता ठेवू नये. यामुळे कुटूंबातील वाद वाढतात.
5. कधीच दूस-याचे कपडे किंवा बुट घालू नये. यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो.
6. घरी एखादा भिकारी किंवा दयनिय व्यक्ती आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नये. काही देणे शक्य नसेल तर थोडेसे खायला द्यावे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.