हिवाळा हा मनाला उत्साह आणि नवचेतना देणारा ऋतू आहे. आयुर्वेदशास्त्रानुसार या ऋतूमध्ये घेतला जाणारा आहार शरीराला मानवणारा असतो. शिवाय तब्येत कमावण्यासाठीही हिवाळा अत्यंत योग्य काळ आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा ऋतू लाभदायी ठरावा, यासाठी या काळात अनेक लोक गुळाचे सेवन जास्त प्रमाणात करतात. कारण थंडीच्या दिवसात शरीराला गरमीची आवश्यकता असते, गुळ ही गरज पूर्ण करतो. गूळ उष्ण असल्यामुळे
आपल्या शरीराला त्याचा फायदा होऊ शकतो.
- गुळाच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढते. शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात आणि हिवाळ्यात शरीरातील तापमान नियमित ठेवण्यासाठी गुळ लाभदायक आहे. जेवण झाल्यानंतर गुळ खाल्यास पोटात गॅस होत नाही.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या हिवाळ्यात गूळ खाण्याचे इतर काही खास फायदे...