आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट्स डेस्क- श्रीलंकेत सुरू असलेल्या निदाहास ट्राय टी 20 सीरीजमधील एका सामन्यात टीम इंडियाने बुधवारी बांगलादेशला 17 धावांनी हरविले. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने शानदार बॅटिंग करत अर्धशतक ठोकले.
रोहितने 61 बॉलमध्ये 89 धावा काढल्या. ज्यात त्याने 5 चौकार आणि 5 षटकार मारले. रोहित या मालिकेत आतापर्यंत फ्लॉप झाला होता व त्याने मागील तीन सामन्यात केवळ 28 धावा केल्या. मात्र, कालच्या सामन्यात तो फॉर्ममध्ये आल्याने त्याचे फॅन्स खूपच खूष झाले. आपला हा आनंद त्यांनी सोशल मीडियात शेयर्स केले. फॅन्सने मजेदार कमेंट्स करत रोहितच्या फलंदाजीचे कौतूक केले.
मॅच समरीः
भारत- 176/3 (20 षटकात) (रोहित- 89, रैना- 47)
बांगलादेश- 159/6 (20 षटकात) (मुश्फिकुर- नाबाद 72)
निकाल- 17 धावांनी भारत विजयी.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, रोहित शर्माबाबत यूजर्सनी काय केल्या प्रतिक्रिया.....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.