आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिस्बेन टेस्ट : विजयच्या शतकाच्या जोरावर दिवसअखेर भारताची स्थिती 4 बाद 311

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - शतकानंतर आनंद साजरा करताना मुरली विजय.
ब्रिस्बेन - येथील गब्बा मैदानावर सुरू असलेल्या दुस-या कसोटीत पहिल्या दिवसाअखेर भारताने मुरली विजयच्या दीडशतकाच्या आधारे 4 बाद 311 अशी मारली आहे. मात्र अवघ्या सहा धावांनी त्याचे दीडशतक हुकले. लायनच्या चेंडूवर 144 धावांवर तो बाद झाला. त्याचबरोबर अजिंक्य राहाणेनेही त्याला चांगली साथ देत अर्धशतकी खेळी केली आहे.
शिखर धवन लवकर बाद झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ भारताचा चेतेश्वर पुजाराही बाद झाला . 18 धावांवर खेळत असताना हेजलवूडने त्याला बाद केले. तो बाद झाला तेव्हा भारताची अवस्था 2 बाद 100 अशी होती. त्यानंतर मुरली विजय आणि कोहली यांची जोडी जमणार असे वाटत असतानाच कोहलीलाही हेडलवूडने 19 धावांवर बाद केले. मात्र विजयने दुसरी वाजू लावून धरत शतक पूर्ण केले. तो मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच लायनच्या एका चेंडूवर हॅडीनने त्याचा झेल घेतला. त्याचे दीडशतक अवघ्या सहा धावांनी हुकले.
विजयचे शतक
मुरली विजयने चांगली कामगिरी करत शकत पूर्ण केले आहे. अॅडिलेडमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही विजयने दोन्ही डावांत अर्धशतक करत 53 आणि 99 धावांची खेळी केली होती. त्यानंतर कामगिरी उंचावत या सामन्यात त्याने शतक केले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये शतक ठोकणारा विजय हा 7 वा सलामीवीर आहे. त्याच्याआधी वीरेंद्र सेहवागने ही कामगिरी केली होती.
धवन पुन्हा फ्लॉप
सलामीवीर शिखर धवन एकदा पुन्हा फ्लॉप ठरला आहे. चांगली सुरुवात केल्यानंतरही मिशेल मार्शच्या वाईड जाणा-या चेंडूला छेडल्यामुळे धवनला मोबदला चुकवावा लागला आणी विकेटकीपर ब्रॅड हॅडीनने न चुकता त्याचा झेल घेतला. धवनला केवळ 24 धावा करता आल्या.
बाद होण्यापूर्वी त्याने मुरली विजयबरोबर पहिल्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली होती. ही भागीदारी करत दोघांनी 23 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. ब्रिस्बेनच्या मैदानावरची ही भारतीय सलामीवीरांची सर्वोत्कृष्ट भागीदारी ठरली आहे. यापूर्वी 1991 मध्ये रवी शास्त्री आणि श्रीकांतने पहिल्या गड्यासाठी 21 धावांची भागीदारी सर्वोत्कृष्ट होती. एवढेच नाही तर पहिल्या डावात कोणत्याही संघाच्या सलामीवीरांनी केलेले हे केवळ दुसरे अर्धशतक आहे.

दरम्यान, सामना सुरू होण्यापूर्वी झालेली नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे पुनरागमन झाले आहे. तर स्पिनर करन शर्माच्या जागी अश्विनला संधी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आराम देत उमेश यादवला संधी देण्यात आळी आहे. तसेच ऑस्ट्रेलिया संघातही तीन बदल करण्यात आले आहेत.
ऑस्ट्रेलियाने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. अॅडिलेडमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा सामन्याची ताजी छायाचित्रे...