आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - महाराष्ट्रात शनिवारच्या शपथविधी आणि सत्ता स्थापनेनंतर राजकीय हालचालींना रविवारी आणखी वेग आला. यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मौन धारण करणारे अजित पवार यांनी ट्विटरवर एकानंतर एक ट्विट केले. त्यामध्येच बोलताना, मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आणि पवार साहेब हेच आमचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सरकार मिळून राज्यात स्थिर सरकार देणार असे अजित पवार यांनी सांगितले. त्यावर वेळीच ट्विट करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केले.
I am in the NCP and shall always be in the NCP and @PawarSpeaks Saheb is our leader.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
Our BJP-NCP alliance shall provide a stable Government in Maharashtra for the next five years which will work sincerely for the welfare of the State and its people.
काय म्हणाले शरद पवार?
अजित पवारांच्या ट्विटला उत्तर देताना शरद पवार यांनी लिहिले, भाजपसोबत आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही. अजित पवार यांची प्रतिक्रिया मुळीच चुकीची आहे. त्यामुळे, गैरसमज निर्माण होत आहेत. लोकांमध्ये चुकीचा संदेश पसरवला जात आहे.
There is no question of forming an alliance with @BJP4Maharashtra.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 24, 2019
NCP has unanimously decided to ally with @ShivSena & @INCMaharashtra to form the government. Shri Ajit Pawar’s statement is false and misleading in order to create confusion and false perception among the people.
तत्पूर्वी राष्ट्रवादीचे आमदारांचे तात्पुरते निवास झालेल्या रिनेसॉ हॉटेलमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राउत यांनी आमदारांना संबोधित केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.