आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : अक्षय खन्नाने सांगितल्याप्रमाणे बॉलिवूडमधील प्रभावी लोकांशी जवळीक म्हणजे काम मिळण्याची गॅरंटी नाहीये. तुकाने एका मुलाखतीमध्ये यासाठी करण जोहरचे उदाहरण देऊन समजावले. तो म्हणाल की, "समाज मी करण जोहरच्या 10 पार्टीज अटेंड केल्या. पण त्यामुळे हे ठरते का की, तो मला त्याच्या पुढच्या चित्रपटात कास्ट करेल ? मोल नाही वाटत की, जर कुणाला मला आपल्या चित्रपटात घ्यायचे असेल तर तो केवळ यामुळे नाही म्हणेल कारण मी करणच्या पार्टीमध्ये सामील नाही झालो."
'सब कुशल मंगल' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे अक्षय...
अक्षय सध्या आपला कॉमेडी चित्रपट 'सब कुशल मंगल' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, जो 3 जानेवारी 2020 ला रिलीज होईल. कॉमेडी जॉनरमध्ये यापूर्वी त्याने 'गली गली चोर है' (2012) केला होता. जेव्हा मुलाखतीदरम्यान त्याला विचारले गेले की, इतके वर्ष तो कॉमेडी चित्रपटांपासून दूर का राहिला तर तो म्हणाला, "अनेक वर्षांपासून कॉमेडीच्या नावावर डबल मिनिंगचे चित्रपट रिलीज होत आहेत. मला असे चित्रपट करायचे नव्हते, ज्यामध्ये अडल्ट ह्यूमर असेल आणि जो फॅमिली ऑडियन्स पाहू शकत नाही."
चित्रपट फ्लॉप झाल्याने होतो प्रतिमेवर परिणाम...
अक्षय खन्ना म्हणाला की, जर एखाद्या अभिनेत्याचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले तर त्याचा नकारात्मक प्रभाव त्यांच्या प्रतिमेवर होतो. एकीकडे जिथे प्रोड्यूसर्सला नुकसान जाळावे लागते तिथे अभिनेत्याची ब्रँड व्हॅल्यूदेखील कमी होते. मात्र अक्षय हेदेखील मान्य करतो की, प्रामाणिकपणे केले गेलेले काम पडद्यावर दिसते. हेच कारण आहे की, ते चित्रपट फ्लॉप झाल्यानंतरही इंडस्ट्रीमध्ये त्याला काम मिळत राहाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.