आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एका गावात एक गरीब पंडित राहत होता. सर्व काही मिळते ते नशिबानेच मिळते असा त्याचा समज होता. जेव्हा त्याचा पुत्र आपल्या गरिबीबाबत विचारत असे, तेव्हा तो सांगायचा की हा सर्व नशिबाचा खेळ आहे. एके दिवशी हाच प्रश्न त्याच्या पुत्राने गावच्या मंदिरातील पुजा-याला विचारला. पुजा-याने त्याला दुस-या दिवशी आपल्या पित्यासोबत येण्यास सांगितले. जेव्हा दोघेही पुजा-याकडे आले. तेव्हा पुजा-याने पुत्राच्या हातातील रेषा पाहून म्हटले, पंडितजी! आपला पुत्र फारच भाग्यशाली आहे; परंतु याच्यावर एका ग्रहाचा प्रकोप आहे. एक अनुष्ठान करण्याने तो कुप्रभाव नष्ट होईल. पंडितजींनी विचारले, आम्हाला काय
करावे लागेल? पुजारी म्हणाला, तुम्ही दोघांनी मिळून आश्रमाच्या अंगणात एक विहीर खोदा म्हणजे ग्रहाचा वाईट प्रभाव आहे तो नष्ट होईल. पिता-पुत्र विहीर खोदण्याच्या कामाला लागले. अनेक दिवसांच्या परिश्रमानंतर त्यांना एक घागर दिसायला लागली. त्यांनी ती घागर पुजा-याकडे नेली. पुजा-याने घागरीवर बांधलेला कपडा काढला. तेव्हा त्यात सोन्याच्या मुद्रा दिसू लागल्या आणि त्यात कागदाची एक चिठ्ठीही होती. ती चिठ्ठी हातात घेऊन त्या मुद्रा पंडितजींना देत पुजारी म्हणाला, हे आपल्या भाग्यात नाही. हे ऐकून पुत्राने पंडितजींना विचारले, भाग्य काय असते हे आपण सांगितले नाही? पुजा-याने ती चिठ्ठी त्याला दिली. त्यात लिहिले होते, भाग्याचेच दुसरे नाव कर्म आहे. आता पंडितजींच्या लक्षात आले की भाग्य म्हणजे आपोआप काहीच घडत नाही. कर्म केल्याने भाग्य साथ देते. तात्पर्य, अकर्मण्यता दुभार्ग्याला आमंत्रण देत असते आणि कर्मातून भाग्य खुलत जाते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.